Monday, November 8, 2010

ओबामाची मुंबई सहल

--- ओबामाची मुंबई सहल
मिशेल ओबामा थोडी वैतागलीच होती. सगळं पॅकिंग एकटीनेच करायचं म्हणजे काय? नवर्‍याची काडीची मदत नाही. अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यापासून त्याला वाटतंय आपण कोण झालो आणि कोण नाही. स्वत:ला अशोक चव्हाण समजतो. स्वत:चे शर्ट व टायदेखील स्वत: बघायचे नाहीत म्हणजे काय?
‘गरम कपडे भरपूर घेऊन ठेव हं.’ ‘उगीच इंटरेस्ट दाखवत बराकराव म्हणाले, ‘माझे लोकरीचे मोजे विसरू नकोस. मुंबईत लागतील.’
‘मुंबईत?’ मिशेल ओरडली. ‘मुंबईतील हवा भट्टीसारखी आहे. लोकरीचे सोडा, नुसते मोजेही तुम्हाला घालता येणार नाहीत. टाय वगैरे विसरा. मलमलचा झब्बा व पायजमा हेच कपडे तुम्हाला सर्वत्र घालावे लागतील. ‘ताज’मध्ये तर माझं ऐका, हाफपॅण्टवर उघडेच बसत जा. आपले सिक्युरिटीवाले सोडून कोण बघायला बसलंय?’
‘सिसावाला झब्बा घे. मोबाईल व सुटे पैसे ठेवायला बरे पडेल.’
‘सुटे पैसे म्हणजे चार आण्याचं नाणं घेऊ नका. ते नुसतंच अस्तित्वात आहे. चालत नाही. दहा पैशांचं नाणं तर मागेच गेलं.’
‘कुठे गेलं?’
‘ते तुमच्या सी.आय.ए.ला शोधून काढायला सांगा.’
‘सी.आय.ए.ला इतर महत्त्वाचे बरेच उद्योग आहेत. सध्या सासू ही कुटुंबात मोडते की नाही या गहन प्रश्‍नाची उकल करण्यात ते गढलेत.’ ओबामा मलमलचा झब्बा मापाचा आहे की नाही ते बघत म्हणाला.
‘हे काय नवीन?’
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलंय की त्यांच्या व्याख्येनुसार सासू ही कुटुंबात मोडत नाही.’
‘म्हणजे माझी आई ही आपल्या कुटुंबाचा हिस्सा नाही?’
‘आहे गं.’ ओबामा प्रेमळपणे म्हणाला, ‘पण उद्या आपल्या ‘व्हाइट हाऊस’मधील एखादी खोली तिला देण्यात आली आणि त्याबद्दल विरोधकांनी माझ्याविरुद्ध प्रचाराची राळ उडवली तर मी अशोकरावांनी घालून दिलेला पायंडा गिरवणार. एरवी तुझी आई मला माझ्या आईसारखीच आहे.’
‘तुम्ही उद्धवसाहेबांना भेटणार की राजसाहेबांना?’
‘नारायण राणेंना. त्यासाठीच मी मराठी शिकत होतो.’
‘भेटल्यासरशी कोट कसा घालायचा तेही शिकून घ्या. बावळटासारखं टाय घालणं सोडून द्या. कणकवलीत लोकप्रिय व्हाल.’
‘बिल क्लिंटन हिंदुस्थानात गाजला होता. त्याच्यापासून वागण्याच्या पद्धती शिकायला हव्यात.’ ओबामा टाय चाचपत म्हणाला.
तो ‘व्हाइट हाऊस’मधल्या प्रकरणातही गाजला होता. त्याच्या त्या वागण्याच्या पद्धती शिकून घेतल्या नाहीत म्हणजे मिळवली’ मिशेल फणकार्‍याने म्हणाली.
‘मी सुरेश कलमाडींना भेटावे अशी हिंदुस्थान सरकारची इच्छा दिसली.
‘कोण आहेत ते गृहस्थ?’
‘नो आयडिया पण त्यांच्या दाढीविषयी खूप ऐकायला मिळालं. ही सीम्स टु बी अ व्हेरी फोकसड् मॅन. दाढी वाढविण्यावर व तिची निगा राखण्यावर त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय. आपल्याला अशा माणसांची गरज आहे, पण हिंदुस्थान त्यांची सेवा उपलब्ध करून देईल असे वाटत नाही.’
‘मला शबाना आझमीला भेटायचं होतं, पण ‘व्हिजीट टू झोपडपट्टी’ असं कार्यक्रम पत्रिकेत लिहिलेलं नसल्याने ती कुठे भेटू शकेल हेच समजत नाही.’ मिशेल विषादाने म्हणाली, ‘त्यातून तिचा नवरा कम्युनिस्ट आहे म्हणे.’
‘हिंदुस्थानातले कम्युनिस्ट म्हणजे पाणी घालून पातळ केलेले वरण. सिनेमा लायनीतले कम्युनिस्ट म्हणजे आपल्या बुशसारखे जोकर्स. ही माणसं महेश भटला ‘इंटेलेक्चुअल’ म्हणतात. आता बोल.’
‘मला कळलं की हिंदुस्थानात फार गरिबी आहे.’ मिशेल म्हणाली, ‘माणसं जमिनीवर बसून हाताने जेवतात.’
‘मी सगळी व्यवस्था केली आहे.’ ओबामा म्हणाला, ‘आपल्याला हाताने जेवता येत नाही हे त्यांना माहित्येय. म्हणून मला मनमोहन सिंगजी व तुला सोनियाजी भरवणार आहेत. एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत जेवायला घालायची त्यांची पद्धत आहे.
‘पण त्याचा अर्थ काय?’
‘मला तरी काय माहीत? जेवण हवं असेल तर रीतीभाती पाळाव्या लागतील.’
‘जेवल्यावर हात धुतात म्हणे?’
‘ते आपल्यासाठी नाही. मनमोहनजी व सोनियाजी हात धुतील.’ ओबामा हात पॅण्टच्या खिशात घालून म्हणाला.
‘दिवाळी म्हणून आपल्याला काय करावं लागेल?’ मिशेलने विचारले.
‘तू एखादी साडी विकत घे. व्यापार पेठेत घेतलीस तर स्वस्त पडेल. मी सोनियाजींना भाऊबीज घालीन.’
‘किती?’
‘जास्त नाही, दोन-पाच लाख डॉलर्स घालीन. इट्स अ टोकन गेस्चर, यू सी.’
‘आपली सुरक्षा व्यवस्था भयंकर आहे म्हणतात. आपल्याला कोणापासून धोका आहे?’ मिशेलने काळजीच्या सुरात विचारले.
‘आपल्याला कसलाही धोका नाही. पण त्यांच्या आपसातल्या मारामार्‍यात आपल्याला चुकून दुखापत होण्याची त्यांना भीती वाटते. आपण आहोत तेवढे तीन दिवस मारामार्‍या स्थगित ठेवण्याची सूचना मी केली, पण ते म्हणाले की शक्य नाही. तेरड्याचा रंग तीन दिवस, आमच्या मारामार्‍या कायमच्याच आहेत.’
‘मग तुम्ही काय म्हणालात?’
‘जय हिंद!’

Wednesday, October 20, 2010

मराठी माणसाची प्रचंड बदनामी करणारे पुस्तक

मराठी माणसाची प्रचंड बदनामी करणारे पुस्तक

इंग्लंडच्या राजपुत्रापासून ते जगभरातील कॉर्पोरेट जगताने मॅनेजमेंट गुरू म्हणून ज्यांना सलाम ठोकला ते मुंबईचे डबेवाले म्हणजे घामटलेली डुकरे आहेत, त्यांच्या घामाला डुकरासारखी दुर्गंधी येते अशी गरळ ‘सच अ लॉंग जर्नी’ या पुस्तकातून ओकणार्‍या रोहिंटन मिस्त्री याच्या विरोधात मराठमोळे डबेवाले आज मैदानात उतरले.

हाच तो हरामखोर रोहिंटन मिस्त्री

मराठी माणसांची प्रचंड बदनामी करणार्‍या त्याच्या ‘सच अ लॉंग जर्नी’ पुस्तकावर कायमची बंदी घाला अशी मागणी डबेवाल्यांच्या संघटनेने केली.
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि मराठी माणसांची मुंबई हुतात्म्यांच्या रक्तातून आणि कष्टकर्‍यांच्या श्रमातून, घामातून उभी राहिली आहे. इथल्या मातीला घामाचा सुगंध आहे. हे परदेशात गार डबक्यात बसून बोरू घासणार्‍या मिस्त्रीला काय कळणार? असा सवाल रघुनाथ मेदगे यांनी केला. आम्ही मराठी आहोत आणि याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. मराठी माणसाचा हा अपमान करणार्‍या
मिस्त्रीच्या या पुस्तकावर कायमची बंदी घाला. अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा मेदगे यांनी दिला. आमच्याकडे अभ्यासाची डिग्री नाही पण जगभरातले मॅनेजमेंटचे विद्यार्थी आमच्या कामाचा, कष्टाचा अभ्यास करतात. आमच्या टाइम मॅनेजमेंटवर पीएचडी सुरू आहे. इंग्लंडचा राजपुत्र चार्ल्सने आम्हाला मानाचे पान दिले. महाराणी एलिझाबेथने इंग्लंडमध्ये बोलवून आमचा सन्मान केला.
व्हर्जिन ऍटलांटीक या जगातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपनीचे अध्यक्ष रिचर्ड बेंन्सन यांनी आमची भेट घेऊन कौतुकाची थाप पाठीवर दिली. जगभरातील पत्रकार, मिडीयाला आमच्या कामाची भुरळ पडली आहे. हा आमच्या घामाचा गौरव आहे आणि हे जर त्या मिस्त्रीला कळत नसेल तर आग लागो त्याच्या शिक्षणाला. परदेशात बसून चिखल चिवडणार्‍या मिस्त्रीने हिंदुस्थानात येऊन दाखवावे असे आव्हानच
डबेवाला संघटनेचे चिटणीस गंगाराम तळेकर यांच्यासह बबन जाचक, रामदास जाधव, बबन वाळंज, दामोदर मेदगे या पदाधिकार्‍यांनी दिले आहे.
* मिस्त्री नाराज
दरम्यान, शिवराळ भाषा असलेले रोहिंटन मिस्त्री याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक शिवसेनेच्या आंदोलनानंतर मुंबई विद्यापीठाने अभ्यासातून वगळले, मात्र विद्यापीठाचा हा निर्णय मिस्त्री याच्या पचनी पडलेला नाही. त्याने विद्यापीठाकडे या निर्णयाबाबत ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्याची नाराजी व्यक्त करणार्‍या या ई-मेलची पत्रके वाटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद
पटवर्धन यांनी विशेेष पुढाकार घेतला.
मुंबईत जन्म झालेला रोहिंटन मिस्त्री कॅनडात स्थायिक झाला आहे. 1 एप्रिल 1991 साली त्याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 424 पानांचे हे पुस्तक असून 2007 मध्ये ते आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाला अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. मराठी माणसांबद्दल अतिशय घृणास्पद उल्लेख असलेले हे पुस्तक 15 ते 16 महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासाठी घेतले होते.

Monday, September 20, 2010

भय्यां हातपाय आवरी

भय्यां हातपाय आवरी
दीड महिन्यांत 12 हजारांनी धरला गॉंव का रास्ता

बिहार-उत्तर प्रदेशातून मुंबईवर धडकणार्‍या परप्रांतीयांचे लोंढे आवरण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले असतानाच आरटीओच्या मोहिमेमुळे या उपर्‍यांना अनपेक्षितपणे जोरदार धक्का बसला आहे. जुन्या टॅक्सींना ‘नवीन बॉडी’ लावून गोलमाल करणार्‍या टॅक्सीचालकांविरुद्ध आरटीओने ‘टॅक्सी काटो’ मोहीम उघडून या टॅक्सी भंगारात फेकल्या आहेत. त्यामुळे या टॅक्सी चालविणार्‍या 12
हजार भय्यांना झटका बसला असून त्यांनी मुंबईतून ‘बोजाबिस्तरा’ आवरून ‘गॉंव का रस्ता’ धरला आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे 25 वर्षांपूर्वीच्या टॅक्सी चालवू नयेत असा नियम आरटीओने काढला परंतु टॅक्सीधंद्यावर कब्जा केलेल्या परप्रांतीयांनी जुन्या टॅक्सींच्या ‘चेसीज’ला नवी बॉडी चढवून आरटीओच्या डोळ्यांत धूळफेक केली. ही बनवाबनवी लक्षात आल्याने आरटीओने टॅक्सींचे परवाने रद्द करून त्या भंगारात फेकून दिल्या. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत
मुंबईतील तब्बल दीड हजार जुन्या टॅक्सी रद्द झाल्या आहेत. अडीच हजार टॅक्सींवर टांगती तलवार आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये या टॅक्सी चालविणार्‍या 12 हजारांहून अधिक परप्रांतीयांना झटका बसला आहे. दुसरे काम नसल्याने या उपर्‍यांनी पुन्हा थेट उत्तर प्रदेश, बिहारमधील आपल्या गावचा रस्ता धरला आहे असे दादरमधील मुलायमसिंग गुप्ता या टॅक्सीचालकाने सांगितले. ‘मुंबईत अभी टॅक्सी
का धंदा नही रहा, गाव जाकर कुछ मोलमजुरी करेंगे’ अशी प्रतिक्रिया लल्लन तिवारी या गोदान एक्स्प्रेसमधून बिहारला परत निघालेल्या टॅक्सीचालकाने व्यक्त केली.

Thursday, September 16, 2010

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!
महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७व्या व ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी
विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७०पर्यंत ८ आथिर्क
वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.


बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६०च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया
एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे.

याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो. इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे. या मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून,
कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत!