Monday, September 20, 2010

भय्यां हातपाय आवरी

भय्यां हातपाय आवरी
दीड महिन्यांत 12 हजारांनी धरला गॉंव का रास्ता

बिहार-उत्तर प्रदेशातून मुंबईवर धडकणार्‍या परप्रांतीयांचे लोंढे आवरण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले असतानाच आरटीओच्या मोहिमेमुळे या उपर्‍यांना अनपेक्षितपणे जोरदार धक्का बसला आहे. जुन्या टॅक्सींना ‘नवीन बॉडी’ लावून गोलमाल करणार्‍या टॅक्सीचालकांविरुद्ध आरटीओने ‘टॅक्सी काटो’ मोहीम उघडून या टॅक्सी भंगारात फेकल्या आहेत. त्यामुळे या टॅक्सी चालविणार्‍या 12
हजार भय्यांना झटका बसला असून त्यांनी मुंबईतून ‘बोजाबिस्तरा’ आवरून ‘गॉंव का रस्ता’ धरला आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे 25 वर्षांपूर्वीच्या टॅक्सी चालवू नयेत असा नियम आरटीओने काढला परंतु टॅक्सीधंद्यावर कब्जा केलेल्या परप्रांतीयांनी जुन्या टॅक्सींच्या ‘चेसीज’ला नवी बॉडी चढवून आरटीओच्या डोळ्यांत धूळफेक केली. ही बनवाबनवी लक्षात आल्याने आरटीओने टॅक्सींचे परवाने रद्द करून त्या भंगारात फेकून दिल्या. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत
मुंबईतील तब्बल दीड हजार जुन्या टॅक्सी रद्द झाल्या आहेत. अडीच हजार टॅक्सींवर टांगती तलवार आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये या टॅक्सी चालविणार्‍या 12 हजारांहून अधिक परप्रांतीयांना झटका बसला आहे. दुसरे काम नसल्याने या उपर्‍यांनी पुन्हा थेट उत्तर प्रदेश, बिहारमधील आपल्या गावचा रस्ता धरला आहे असे दादरमधील मुलायमसिंग गुप्ता या टॅक्सीचालकाने सांगितले. ‘मुंबईत अभी टॅक्सी
का धंदा नही रहा, गाव जाकर कुछ मोलमजुरी करेंगे’ अशी प्रतिक्रिया लल्लन तिवारी या गोदान एक्स्प्रेसमधून बिहारला परत निघालेल्या टॅक्सीचालकाने व्यक्त केली.

No comments:

Post a Comment